अनेक दिवसांपासून काहीतरी लिहावे असे वाटत होतेपण योग्य तसे अथवा मनाला पटेल असे कही सुचत नव्हते, शेवटी इतके दिवस थाम्बुन काहीच न सुचल्याने असेच कही तरी लिहायचे असे ठरवून बसलो आहे, आता पर्येन्त अनेक जणांचे "आत्मचरित्र" (शब्द थोड़ा जड़ वाटतो ना ?) म्हणुन मी त्याला "अनुभव" म्हणतो, तर असे वाचताना आपण ही असेच कही तरी लिहावे असे सारखे वाटायचे, बरोबर बरोबर ! तुमच्या मनातला विचार योग्यच आहे, की मी स्वतःला कोण समजतो? माझे कर्तुत्व काय? मी असा कोण लागुन गेलो स्वतः चे अनुभव लिहायला? मान्य एकदम मान्य की मी कोणी मोठी, कर्तबगार व्यक्ति नही आणि होणार ही नाही........(माझ्या बद्दल सदिच्छा असणारे म्हणतील की होशील रे!!!!! पण खर सांगू माझी मलाच खत्री नाहीये... असो) शेवटी मी साधा विचार केला की लिहिणारा मी च आहे आणि वाचणारे तुम्ही च आहात... आणि मी अणि तुम्ही मधे काही जास्ती अन्तर नाहीये.......
चला तर मुळ मुद्दया कड़े वलुयात मी Australia मधे आलो आणि मला परिचित असलेल्या व्यक्ति बदलेल्या वाटल्या, अनेक मित्रं शी आणि नातेवैकां शी बोलणे होत होते.......पण सगलेच वेगले वाटत होते॥ असे का अनेक दिवस वाटत राहिले आणि मग माझ्या लक्षात आले की माझ्या परिचित व्यक्ति नाही तर मीच बदललो आहे ते........याचे कारण काय असा विचार करताना अनेक गोष्टी मानत आल्या आणि आता मी त्याच लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे.......... हा प्रयत्न खर तर माझ्याच साठी उपयोगाचा आहे ..कसा ते वाचताना लक्षात येईलच....
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
4 टिप्पणी(ण्या)
jabari re keep it up...
all the best!! Keep it up!!
All the best!!
keep it up!!
Well Done....
Kharach khup chan lihatos....
टिप्पणी पोस्ट करा